Festival Posters

पुणे अनलॉक; मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय

Webdunia
शुक्रवार, 11 जून 2021 (12:47 IST)
पुण्यातील निर्बध शिथिल करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा करत आता मॉल्स आणि दुकांन उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, तर रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. येत्या सोमवारपासून हे निर्णय लागू होणार आहे. मात्र, पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हे लागू होईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
 
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन यात निर्बध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर अजित पवार यांनी नियमांची माहिती दिली. सोमवारपासून या नियमावलीचं पालन करून मॉल्स सुरू करण्यास तसेच दुकानंही ४ वाजेऐवजी ७ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
हे नियम सोमवारपासून लागू होणार असले तरी यापूर्वी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जाणार आहे. त्याबद्दल स्पष्ट करत अजित पवारांनी म्हटले की पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल, तर हे लागू केलं जाईल, अन्यथा निर्णय बदलावा लागेल. त्यांनी पुणेकरांना आवाहन केले  की, त्यांनी नियमांचं पालन करावं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

भाविकांनी भरलेल्या ट्रॉलीला ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारने डॉक्टर असल्याचे भासवून कौन्सलिंगच्या नावावर विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली

नीट यूजी परीक्षा वाद छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढील लेख
Show comments