rashifal-2026

Weather Update:पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह रेड अलर्टचा इशारा

Webdunia
शुक्रवार, 23 मे 2025 (13:04 IST)
सध्या राज्याला पावसाने झोडपले आहे.राज्यातील अनेक भागात हवामानात बदल होत आहे. हवामान विभागाने पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यात पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 
ALSO READ: वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवार यांची मोठी कारवाई, राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी
पुणे  जिल्ह्यात  काही ठिकाणी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

हवामान खात्याने महाराष्ट्रातील संपूर्ण कोंकणपट्टीला ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी आणि रायगडला रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात वाऱ्याचा वेग 35 ते 40 किमी प्रति तासाने वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. 
काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
ALSO READ: Weather Alert महाराष्ट्रात अनेक भागात ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला
मासेमाऱ्यांना गुजरातकिनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
पुण्यात गुरुवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
ALSO READ: महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रवेशद्वारा समोर उपोषण सुरू
पुणे जिल्ह्यातही काही भागांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत पावसाची नोंद झाली. यामध्ये भोर तालुक्यात सर्वाधिक 49 मिमी पावसाची नोंद झाली 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments