Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन होतंय, पण…पवारांनी मोदींना उद्देशून म्हटले

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2022 (15:20 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (रविवारी) पुणे मेट्रोचं उद्धाटन होणार आहे. त्यादृष्टीने शहरात तयारीही सुरू आहे. या कार्यक्रमावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे मेट्रोचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना त्याचे उद्घाटन होत आहे. उद्या जर काही संकट निर्माण झाले तर त्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल, असे पवारांनी मोदींना उद्देशून म्हटले आहे.
 
पवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान उद्या पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत आहेत. मोदी महापालिकेतून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. मेट्रो सुरु करण्यात येणार आहे. एका महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवण्यासाठी नेले होते. जेथून मेट्रो धावणार आहे तेथून मी प्रवासही केला. त्यावेळी मेट्रोचे काम झालेले नाही हे माझ्या लक्षात आले. काम झालेले नसतानाही उद्घाटन होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही. पण उद्या जर काही संकट निर्माण झाले तर त्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
 
आज नदी सुधार प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. पण मोदींचा सुधारणा करण्याऐवजी सुविधांवर भर आहे. नदी सुधारण्याचं काम हाती घेतलं पाहिजे. नदीवर अनेक धरणं आहेत. त्यामुळं कधी ढगफुटी झाली तर या मोठय़ा संकटाची झळ आजूबाजूच्या गावातील लोकांना बसणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

सर्व पहा

नवीन

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

चंद्रपुरात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ उडाली

मोदींनी करोडो लोकांना आळशी बनवले, मोफत धान्य देणे म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

कोटा मध्ये आत्महत्येचा आकडा 14, JEE ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद

पुढील लेख
Show comments