Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक-पुणे महामार्गावर दाट धुक्यामुळे भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार

Webdunia
शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (20:03 IST)
पुणे  :- आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराजवळ असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
 
तिघा जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर 2 जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मृत हे एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पंकज खंडू जगताप (वय 36), मधुकर तुकाराम अहिरे (वय 52), शांताराम संभाजी आहिरे (वय 50) सर्व रा. जायखेडा ता. सटाणा अशी मृतांची नावे आहेत.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, मंचरजवळ भल्या पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने जात असताना क्रुझरने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की क्रुझरच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दाट धुके असल्याने समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे क्रुझरमध्ये असलेल्या तिघांचा गाडीत अडकून जागेवरच मृत्यू झाला आहे.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कमोडच्या सीटपेक्षा जास्त जंतू असतात? संशोधक काय इशारा देतात? वाचा

शिंदे सरकारने स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले

भाजपने 24 राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी घोषित केले जावडेकरांसह या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी,17 जुलै रोजी सुनावणी

केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गामुळे मुलाचा मृत्यू

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

पुढील लेख
Show comments