Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लशींच्या तुडवड्याने केंद्रांवर वादावादीचे प्रकार

लशींच्या तुडवड्याने केंद्रांवर वादावादीचे प्रकार
Webdunia
शनिवार, 17 जुलै 2021 (08:31 IST)
पिंपरी चिंचवडमध्ये आदल्यादिवशी टोकन देणे ठरेल योग्य कोरोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यामुळे प्रशासन आणि नागरिकांना विविध अडचणींना,समस्यांना सामोरे जावे लागत आहे.लसीकरणासाठी पहाटेपासूनच केंद्रांबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. एका केंद्रांवर केवळ 100 लशींचे डोस उपलब्ध असतात.रांगेत थांबूनही लस मिळत नसल्याने नागरिक संतप्त होतात अन् अनेकदा वादावादीचे प्रकार घडतात. नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांनाही पाचारण करावे लागते. त्यासाठी यमुनानगर केंद्रांवर आदल्यादिवशीच टोकन देण्याची पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे जेवढे टोकन मिळालेत तेवढेच नागरिक रांगेत थांबतात. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वंच केंद्रांवर ही पद्धत अवंलबण्याची आवश्यकता आहे.
 
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून दुस-यादविशी कोणत्या केंद्रांवर कोणती आणि किती क्षमतेने लस मिळणार याची माहिती आदल्यादिवशी प्रसिद्ध केली जाते. नागरिकांना रांगेत ताटकळत थांबावे लागू नये यासाठी यमुनानगरमधील लसीकरण केंद्रांवर एक चांगला पर्याय काढला आहे.आदल्यादिवशीच सायंकाळी पाच वाजता नागरिकांना टोकन दिले जाते.
 
ज्या नागरिकांना टोकन मिळाले.तेवढेच नागरिक दुस-यादिवशी रांगेत थांबतात.त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचतोय आणि लसही मिळत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.शहरातील सर्वच केंद्रांवर ही पद्धत अंवलबण्याची आवश्यकता आहे.जेणेकरुन गोंधळ होणार नाही. नागरिकांना पहाटेपासून रांगेत थांबावे लागणार नाही.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कोण आहे अण्णा बनसोडे? जे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष झाले

LIVE: नाशिक जिल्ह्यात अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे प्रकरण समोर आले

सुरगाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले

उद्धव ठाकरे सरकारमध्ये पुरावे नष्ट, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात भाजप नेते राम कदम यांची नवी मागणी

मुख्यमंत्री योगींनी राहुल गांधींना "नमुना" म्हटले, संतप्त काँग्रेस नेते म्हणाले- यूपीवर लक्ष केंद्रित करा...

पुढील लेख
Show comments