Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चरणजीत सिंह चन्नी दोन्ही मतदारसंघात पराभूत

Webdunia
गुरूवार, 10 मार्च 2022 (16:54 IST)
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर दोन मतदारसंघांमध्ये पराभवाची नामुष्की ओढवली. चमकौर साहिब आणि भदौर अशा दोन मतदारसंघांमधून चन्नी यांनी निवडणूक लढवली होती.
 
"पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना हरवणारा एका मोबाईलच्या दुकानात काम करतो. लाभ सिंह त्यांचं नाव. तो मोबाईल रिपेअरिंगचं काम करतो. आम आदमी काय करू शकतो याचं हे उदाहरण. आता आपल्याला देशात क्रांती आणायची आहे," असं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
 
पंजाब राज्यात आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवत सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतला होता. काँग्रेस पक्षातील अंतर्गत सुंदोपसुंदीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला.
 
अमरिंदर भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र त्यांनी पंजाब पीपल्स काँग्रेस नावाच्या पक्षाची स्थापना केली. काँग्रेस हायकमांडने चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली. चन्नी पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरले होते.
 
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरही चन्नी आणि सिद्धू यांच्यात बेबनाव होता. दरम्यान सिद्धू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. सिद्धू यांचा अमृतसर ईस्ट मतदारसंघातून पराभव झाला.
 
योगायोग म्हणजे याआधीही पंजाबचे मुख्यमंत्री राहिलले नेते या निवडणुकीत जिंकू शकलेले नाहीत. चन्नी यांच्या आधीचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
 
58 वर्षीय चन्नी दलित शीख समाजातले नेते आहेत. अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते तंत्रशिक्षण मंत्री होते.
 
पंजाबमध्ये आम आदमी पक्षानंही बहुमताचा आकडा ओलांडला आहे. या क्रांतीसाठी पंजाबच्या जनतेचे आभारी आहोत, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संबंधित माहिती

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

पुढील लेख
Show comments