Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उमेदवारी नाकारणे म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नाही : शाहू राजे

उमेदवारी नाकारणे म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नाही : शाहू राजे
Webdunia
शनिवार, 28 मे 2022 (22:05 IST)
विधानसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे (Sambhaji Raje) यांना उमेदवारी शिवसेनेने (Shivsena) नाकारल्यानंतर छत्रपती घराण्याचा अपमानाचा केल्याची टीका शिवसेनेवर सर्वच स्तरावरुन करण्यात आली. परंतु, शाहू राजे (Shahu Raje) यांनी छत्रपती घराण्याचा अपमानाचा प्रश्नच येत नाही, हे राजकारण आहे, असे स्पष्ट केले आहे. 
 
मान झुकेल असं कोणतंही काम आम्ही केलं नाही - PM मोदी
शाहू राजे म्हणाले की, छत्रपती घराण्याचा अपमानाचा प्रश्नच येत नाही, हे राजकारण आहे. उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध नाही, त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. राजकारणात संभाजीराजेंचे सर्व निर्णय व्यक्तिगत होते. घराण्याची किंवा माझी संमती घेऊन पावलं उचलली नाहीत.
 
Devendra Fadnavis | 'मुख्यमंत्र्यांविरोधात बोलले तर तुम्हाला पाच ठिकाणच्या जेलमध्ये जावे लागेल'
स्वराज्य पक्ष स्थापन करणार आणि इकडे राज्यसभा मिळवणार हे गणित मुळातच चुकीचे आहे. स्वराज्य पक्ष स्थापन करायचाच होता तर तुम्हाला कुणाकडे जाण्याची गरज नव्हती. राज्यसभा पाहिजे होती तर भाजपला भेटले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटायला पाहिजे होते. यासाठी दोन ते तीन महिन्यापासूनच ही प्रक्रिया सुरु करायला पाहिजे होती, यासाठी त्यांनी खूप उशीर केला, असेही त्यांनी सांगितले.
 
संभाजीराजेंनी पाठिंबा मागितला यावर बोलताना शाहू महाराज म्हणाले, पाठिंबा पाहिजे होता तर इतर नेत्यांकडे सुद्धा जाणं गरजेचं होतं. एकीकडे राज्यसभेसाठी गणित जुळवून आणता तर दुसरीकडे पक्ष घोषित करणं हा निर्णय चुकलाच, असेही शाहू राजेंनी म्हंटले आहे.
 
Bailgada Sharyat | शर्यत बैलगाड्यांची, चर्चा मात्र बक्षीसांच्या जेसीबी, जीप, ट्रॅक्टरची
संभाजीराजेंनी निर्णय घेतल्यानंतर विनिमय करायला माझ्याकडे ते कधीच आले नाहीत. आपण घोषणा केल्यानंतर सगळे आपल्याकडे धावून येतील. संभाजीराजेंचा हा अंदाज चुकला. राजकारणामध्ये असं एकदम काहीच होत नाही. विचार विनिमय अनेक प्रकारचे असतात. छत्रपती घराण्याचे असल्यामुळं सगळे आपल्याकडे यायलाच पाहिजे, असेही होतं नाही. छत्रपती घराण्याला पाठिंबा द्यायचा की नाही हा प्रश्न नव्हताच. तर संभाजीराजेंना पाठिंबा द्यायचा की नाही हा मुळ प्रश्न होता, असे स्पष्टीकरणही शाहू राजेंनी दिले आहे.
 
संभाजीराजेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राज्यभर पक्ष मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. यावर स्वराज्य पक्ष मोठा केला तर एक राज्यसभा कशाला चार राज्यसभा मिळतील, असे शाहू राजेंनी म्हंटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

DC vs LSG Playing 11: अक्षर पटेल आणि ऋषभ पंत यांचे संघ एकमेकांसमोर येणार

कुणाल कामरा वाद प्रकरणात राहुल कनालसह ११ जणांना अटक, अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल

गद्दार ते गद्दारच, कुणालने काहीही चुकीचे बोलले नाही- उद्धव ठाकरेंचे विधान समोर आले

जर घरे पाडली तर आम्ही घरात घुसून मारहाण करू, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नरेंद्र पाटील यांचा इशारा

LIVE: राहुल गांधी आणि कामरा दोघांनीही संविधान वाचलेले नाही, शिंदेंवरील टिप्पणीवर मुख्यमंत्री संतापले

पुढील लेख
Show comments