Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीराम पंचवटी नाशिक येथे थांबले होते, जाणून घ्या खास 8 गोष्टी

Webdunia
रविवार, 18 एप्रिल 2021 (11:49 IST)
दंडकारण्यामध्ये अनेक मुनींच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या, सरोवरे, पर्वत आणि वने पार करुन नाशिकात अगस्त्य ऋषींच्या आश्रामत गेले. अगस्त्य ऋषींचा आश्रम नाशिकमधील पंचवटी येथे होता. रामायणात पंचवटीचं अत्यंत मनमोहक वर्णन केलेलं आहे.
 
वनवास दरम्यान श्रीरामांनी सीता व लक्ष्मण यांच्यासह काही काळ आश्रामात व्यतीत केला. त्यांनी पर्णकुटी तयार करुन येथे वास्तव्य केलं. 

अगस्त्य मुनींनी रामांना त्यांच्या अग्निशाळेत तयार केलेली शस्त्रे भेट दिली.
 
पंचवटीच्या जवळच मृगव्याधेश्वर येथे मारिचा राक्षसाचा वध झाला होता. याच ठिकाणी जटायू आणि रामांची मैत्री झाली होती. 
 
श्रीराम पंचवटीत राहिले आणि त्यांनी गोदावरी तटावर स्नान आणि ध्यान केले. नाशिका गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे स्थान हे पंचवटी म्हणून ओळखले जातात.
 
वड, पिंपळ, आवळा, बेल आणि अशोक हे ते पाच वृक्ष आहेत. ह्याच ठिकाणी सीता मातेच्या गृहेजवळ पाच प्राचीन वृक्ष आहेत. ह्या वृक्षांना पंचवट म्हटले जाते.
 
असे म्हणतात की श्रीराम-सीता व लक्ष्मण ह्यांनी स्वत: ही झाडी लावली. ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. श्रीराम-लक्ष्मणाने खर व दूषण ह्या राक्षसांशी युद्ध देखील केले होते.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments