Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अडीच एकर शेतीसाठी चौघांची निर्घृण हत्या

Webdunia
मंगळवार, 15 एप्रिल 2014 (17:25 IST)
बाळापूर तालुक्यामधील बाखराबादमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अवघ्या अडीच एकर शेतीच्या वादातून भगवंतराव आणि विश्वनाथ माळी या दोन भावांच्या कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये माळी कुटुंबियांमधील एका महिलेसह चौघांचा समावेश आहे.

1998 मध्ये भगवंतराव माळी यांनी गजानन माळी यांच्याकडून अडीच एकर शेती खरेदी केली होती. मात्र त्यानंतर गजानन यांनी शेतीची खरेदी करुन देण्यास टाळाटाळ केली आणि अखेर हा वाद कोर्टात गेला होता. नुकताच याप्रकरणी हायकोर्टाने भगवंत माळी यांच्या बाजूने निकाल दिला.

निकाल आपल्या विरोधात लागल्याचा राग मनात ठेवत सोमवारी सायंकाळी गजानन माळी यांनी त्यांच्या दोन मुलांसह भगवंत माळी यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवला. यामध्ये विश्वनाथ बळीराम माळी (75), राजेश भगवंतराव माळी (37), योगेश भगवंतराव माळी (27) आणि वनमाला विश्वनाथ माळी (45) यांचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे ही सर्व घटना गावांतील नागरिकांसमोर घडली. मात्र, भीतीमुळे मदतीसाठी कोणीही सरसावले नाही. 

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गजानन माळी आणि त्यांचा मुलगा नंदेश याला अटक केली आहे. तर दीपक गजानन माळी हा आरोपी फरार झाला आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

Show comments