Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्यथा जनता तुमचाही अजित पवार करेल-उद्धव ठाकरे

Webdunia
मंगळवार, 25 नोव्हेंबर 2014 (11:17 IST)
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. मोबाईलचे बिल भरता मग वीजेचे  का नाही? असा सवाल शेतकर्‍यांसमोर उपस्थित करणारे एकनाथ खडसे यांना उद्धव यांनी शेतकर्‍यांच्या मोबाईलला नेटवर्क तरी असते तुमच्या विजेचा आजही पत्ताच नाही, असा टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहे. दुष्काळ परिस्थिती जाणून घेण्यासाठी ते आले आहेत. आज (मंगळवारी) जालना जिल्ह्याचा दौरा करतील. नंतर औरंगाबादकडे रवाना होतील. 
 
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात सरकार बदलले आहे याची जाणीव शेतकर्‍यांना होऊ द्या. विजेचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी आजही हाल सोसत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. आपल्यात आणि अजित पवार यांच्यात फरक आहे याची जाणीव लोकांना होऊ द्या आणि किमान शेतकर्‍यांची खिल्ली उडवू नका. 
 
दरम्यान, अकोल्यातील पत्रकार परिषदेत एकनात खडसे यांनी मोबाईलचे कनेक्शन कट होऊ नये म्हणून हजार रुपयांचे बील भरायला पैसे असतात. मग वीजबील का भरत नाही, असा सवाल उपस्थित करत शेतकर्‍यांकडे पैसे नाहीत हे आपल्याला पटत नसल्याचे वक्तव्य केले केले होते. फारतर वीजबिलात सवलत देऊ, परंतु शेतकर्‍यांना वीजबिल माफ करता येणार नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले आहे. 

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments