Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमिरवर शिवसेनेचा हल्ला

Webdunia
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (10:32 IST)
मुंबई- असहिष्णुता वाढल्याचा दावा करून देश सोडण्याचे वक्तव्य करणार्‍या अभिनेता आमिर खानवर शिवसेनेने टीकेचा भडिमार केला आहे. आमिर खानला बाईलबुद्ध्या, इडियट, रणछोडदास, बेइमान, पळपुट्या अशा शेलक्या शब्दात हिणवतानाच, ‘देश सोडून जायला तुझ्यावर असे कोणते संकट कोसळले आहे हे तरी कळू दे,’ असा संतप्त सवाल शिवसेनेने आमिरला केला आहे.
 
आमिरच्या असहिष्णुतेच्या तक्रारीवर शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार हल्ला चढवला आहे. देश सोडून जाण्याची आमिरची भाषा बेइमानीची आहे. ज्याला हा देश आपला वाटत नाही त्याने उगाच देशभक्तीच्या व ‘सत्यमेव जयते’च्या वल्गना करू नयेत, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.
 
शिवसेना म्हणते..आमिरला कोणत्या कारणांमुळे देशातून पळून जावेसे वाटले व या बाईलबुद्ध्याने ‘मातृभूमीस’ टांग मारून फिल्मी बायकोचे सांगणे इतके मनावर का घ्यावे हे त्याचे त्यालाच माहीत. या वक्तव्याने त्याच्या ‘सत्यमेव जयते’चा मुखवटा साफ गळून पडला आहे व देशभक्तीचा फुगा फुटला आहे. देश संकटात असताना येथे ठामपणे उभे राहण्याचे सोडून सिनेमातील ही ‘खान’ जमात पळून जायची भाषा करते, पण मुळात या पळपुट्यावर असे कोणते संकट कोसळले आहे ते तरी कळू द्या.
 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments