Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएल महाराष्ट्राबाहेरच

Webdunia
नवी दिल्ली- आयपीएलचे 1 मे नंतरचे सामने आता महाराष्ट्राबाहेरच होतील. भीषण दुष्काळामुळे राज्यात होणारे आयपीएलचे सामने इतर ठिकाणी खेळवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
 
राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, आयपीएलचे महाराष्ट्रात होणारे 13 सामने इतर राज्यात खेळवण्यात यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर बीसीसीआयने विनंती केल्याने 1 मे रोजी पुण्यात होणारा सामना खेळवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. तसेच आयपीएलच्या वेळापत्रकानुसार, सामने खेळवण्यात यावेत, अशी विनंती केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. महाराष्ट्रात पाणीटंचाई असताना आयपीएलचे सामने नको. भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे सामने महाराष्ट्राबाहेरच खेळवणे योग्य आहे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
 

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

पुढील लेख
Show comments