Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इमारत दुर्घटने प्रकरणी नवीन कायदा करणार

वेबदुनिया
WD
मुंबई आणि उपनगरात पावसाळा सुरू झाल्यापासून मागील एका महिन्यात इमारत दुर्घटनेच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचपाश्र्वभूमीवर इमारत दुर्घटनेप्रकरणी नगरविकास विभाग नवीन कायदा करण्याचा विचार करीत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मागील दोन महिन्यांत मुंबईसह उपनगरांत इमारत दुर्घटनेच्या आतापर्यंत पाच घटना घडल्या आहेत. त्यात अनेक लोकांचे प्राण गेले. बुधवारी रात्री भिवंडीत इमारत कोसळून तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. अशा वाढत्या घटना पाहता सरकारने इमारत दुर्घटनेप्रकरणी नवीन कायदा करण्याचे ठरविले. या कायद्याअंतर्गत इंजिनिअर,आर्किटेक्टवर कारवाई करण्याची तरतूद असेल, असे अजित पवारांनी सांगितले.

बुधवारी भिवंडीत घडलेली इमारत कोसळण्याची पाचवी घटना आहे. इमारत कोसळणा-या इमारतींसाठी इमारतीच्या आर्किटेक्ट आणि इंजिनिअरलाही जबाबदार धरले जाणार असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत.

४ एप्रिलला शिळफाट्याच्या ‘लकी कंपाउंड’ मध्ये कोसळलेल्या इमारतीत ७४ बळी गेले आहेत. त्यानंतर १० जूनला माहिमची ‘अल्ताफ मेन्शन’ कोसळली. त्यात १० जणांचा मृत्यू झाला. २१ जूनला मुंब्रात ‘स्मृती’ अपार्टमेंट इमारत कोसळली त्यात १० जणांचा मृत्यू झाला तर त्याच्या दुस-या दिवशी २२ जूनला दहिसरमधे ‘पियूश’ को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी कोसळली त्यात ७ जणांच्या बळी गेला. या वाढत्या घटनामुळे ठाणे जिल्ह्यातील इमारतींवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा इमारत दुर्घटनांमध्ये एकट्या ठाणे जिल्ह्यात ८७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. ठाणे जिल्ह्यात हे अपघात का होत आहेत? ठाणे जिल्ह्यात अनधिकृत इमारतींचे पेव का फुटले आहे? प्रशासन डोळेझाक का करीत आहे? असे अनेक प्रश्न त्यानिमित्ताने पुढे आले आहेत.

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

Show comments