Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उध्दव यांची मागणी म्हणजे उशिराचे शहाणपण : विखे

Webdunia
गुरूवार, 5 मे 2016 (11:08 IST)
केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर करावी ही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मागणी म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी व्यक्त केली. कर्जमाफीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमं‍त्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 
मागील चारही आधिवेशनात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनेही केली. तेव्हा मात्र शिवसेना गप्प बसली होती. आता अचानक शिवसेनेला शेतकरी कर्जमाफीची आठवण कशी झाली, हेच मोठे आश्चर्य आहे. 
 
शेतकरी कर्जमाफीची मागणी आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे शिवसेना कर्जमाफीच्या मागणीवर ठाम असेल तर त्यांनी सरकारवर यासंदर्भात तातडीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यासाठी दबाव आणावा. राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर पंधरा दिवसात कर्जमाफीची घोषणा करता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments