पंन्नास कोटी रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाºयांना आजपासून एलबीटीतून सूट मिळणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे ९९.८५ टक्के व्यापार्यांना ५ हजार कोटी रुपयांची सूट मिळणार आहे तर राज्यातील जनतेवर कोणताही अतिरिक्त कर लादण्यात आलेला नाही, असा दावाही सरकारने केला आहे. राज्यात एकूण ८ लाख ९ हजार ५५३ एलबीटी भरणारे व्यापारी असून त्यापैकी ८ लाख ८ हजार ३९१ व्यापाºयांना या निर्णयामुळे एलबीटी भरावा लागणार नाही.