Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसएमएस करुन विद्यार्थी करणार व्होटींग

Webdunia
शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (11:53 IST)
महाराष्टातील महाविद्यालयांमध्ये बंद पडलेली निवडणुकीची परंपरा पुन्हा सुरु होणार असून निवडणुकीवेळी होणारे वाद, हाणामार्‍या   आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना एसएमएस वरुन व्होटींग करण्याचा पर्याय भाजपा सरकार देणार आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. 
 
राज्यातील महाविद्यालयांत निवडणूक घेऊन विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती केली जात असे. मात्र, यामध्ये शिरलेले राजकारण आणि वाद, हाणामार्‍यांमुळे  या प्रक्रियेला गालबोट लागले. महाविद्यालयांत अशा प्रकारांनी निवडणुका गाजू लागल्याने ही पध्दतच बंद करण्यात आली होती. मात्र, लोकशाही पध्दतीनेच विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणुक व्हावी, या उद्देशाने पुन्हा निवडणुक पध्दत घेण्याचे धोरण राज्यातील भाजपा सरकारने निश्चित केले आहे. मात्र, यातील गैरप्रकार रोखण्यासाठीही काळजी घेतली जात आहे.
 
याबाबत बोलताना तावडे म्हणाले,  विद्यापीठ, महाविद्यालयातील निवडणुकांची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण केली जाईल. उमेदवारांना  एक नंबर दिला जाईल व मतदानासाठी काही दिवसांचा कालावधी दिला जाईल. त्यांना एसएमएसद्वारे मतदार केले जाईल.    

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

Show comments