Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याचे दर घसरले; जबाबदारी कोण घेणार

Webdunia
शनिवार, 4 जुलै 2015 (12:36 IST)
केंद्र सरकार कुणासाठी काम करीत आहे, कांद्याचे निर्यातीचे दर वाढवल्यामुळे लासलगावच्या मार्केटमध्ये कांद्याचे स्थानिक विक्रीचे दरही कोसळले याची जबाबदारी कोण घेणार असे सवाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. पत्रकार परिषदेत राज्य व केंद्र सरकारांची धोरणे शेतकरीविरोधी आहेत असे सांगताना चव्हाण म्हणाले की, कांद्याचा निर्यातीचा दर सतरा हजार रुपये प्रतिटन होता तो केंद्राने 27 हजार रुपयांवर नेला आहे
 
जे कांद्याचे झाले तेच उसाचेही सुरू आहे. उसाला राज्य सरकार मदत देणार असे मुख्यमंर्त्यांनी सांगितले प्रत्यक्षात टनामागे दोनशे रुपयांच्या आसपास व तेही काही ठरावीकच कारखान्यांना पैसे मिळणार आहेत. साखरेचे भाव 1800-1900 रुपयांवर प्रति क्विंटल  गेलेले असताना उसाला 2100 रुपये भाव द्या असा आग्रह राज्य सरकार कसा धरत आहे काही समजत नाही असेही चव्हाण म्हणाले. राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत मात्र त्यांना दिलासा देण्यात सरकार काहीही करीत नाही. शेतकर्‍यांची कर्जे माङ्ख केली जाणार या आशेवर अनेक शेतकरी जीव तगवून होते पण आता तीही आशा संपल्याने आत्महत्या करतो असेच एका शेतकर्‍याने लिहून ठेवले आहे. असे सांगून चव्हाण म्हणाले की जोवर हे सरकार शेतकर्‍यांची कर्जे माफ करणार नाही तोवर आमचे आंदोलनही सुरू राहील विधानसभेचे कामकाज 13 जुलैला सुरू होईल, पहिला दिवस शोक प्रस्तावाचा असेल मात्र 14 जुलैपासून आम्ही सभागृहाचे कामकाज रोखून ठेवणार आहोत असेही अशोक चव्हाण म्हणाले.

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

Paris Olympics 2024: कुस्ती संघटना 21 मे रोजी चाचण्यांबाबत निर्णय घेऊ शकते

PM Modi In Mumbai : स्वप्नांच्या शहरात मी 2047 चे स्वप्न घेऊन आलो आहे- पंतप्रधान मोदी

एलोर्डा चषक बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरीत निखत जरीनसह चार बॉक्सर्स

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

Show comments