Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूरात कर्नाटकच्या बसेसची तोडफोड

Webdunia
शनिवार, 26 जुलै 2014 (10:26 IST)
कर्नाटकातील बेळगावजवळच्या येळ्ळूरमधील  महाराष्ट्र राज्य लिहिलेला फलक काढून टाकल्याचे वाईट पडसाद शुक्रवारी कोल्हापुरात उमटले. कर्नाटक प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी कोल्हापुरात बसेसची तोडफोड केली. या आंदोलनाचे नेतृत्त्व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.  
 
कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशानंतर येळ्ळूर गावच्या पंचायतीवरचा भगवा झेंडा काढण्य़ात आला होता. तसेच येळ्ळूरच्या सीमेवर असणारे महाराष्ट्राचे फलक प्रशासनाने निकाल येण्याआधीच काढून टाकला. त्यामुळे शिवसेनेन हे आंदोलन केले . 
कर्नाटक सरकारची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. सीमाभागातील मराठी भाषीकांची गळचेपी होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 
 
येळ्ळूर गावाच्या सीमेवर 1956 पासून महाराष्ट्र राज्याचा फलक आहे. मात्र, हायकोर्टाचा निकाल येण्याआधीच कर्नाटकने तो काढून टाकला. 27 जुलैला याबाबत याबाबत निकाल येण्याची शक्यता आहे. गावाच्या पंचायतीवर असलेल्या भगवा झेंडा काढण्याचे आदेश कर्नाटक हाय कोर्टाने दिले आहेत. 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments