Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर विकासासाठी ११५ कोटीः हर्षवर्धन पाटील

Webdunia
आगामी वर्षातील विविध योजनांच्या पूर्ततेसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ११५ कोटी ३६ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीनंतर पत्रकारांना बोलताना दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कामे लक्षात घेता २००९ -१० या कॅलेंडर वर्षासाठी ८९ कोटी ३६ लाख रूपयांच्या निधीला मान्यता मिळालेली असून त्यापैकी २९ कोटी रूपयांचा निधी आत्तापर्यंत प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गेल्या काही वर्षांचा अनुशेष, दरवर्षी या जिल्ह्याला भेडसावणारी अतिवृष्टीची समस्या, वाढती लोकसंख्या या घटकांचा विचार करून यंदा २० कोटी रूपयांचा जादा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष घटक योजनेतंर्गत २५ कोटी ८७ लाख रूपयांचा निधीही मंजूर झाला असून आदिवासी विकास योजनेकरीताही अतिरिक्त १२ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे असे पाटील यांनी सांगितले.

गेल्या वर्षी मंजुर झालेल्या ६९ कोटी ३७ लाख रूपयांच्या निधीबाबत माहिती देताना पाटील यांनी हा निधी संपूर्णपणे वापरला गेला असल्याचे सांगितले. या निधीतील ४० कोटी रूपये हे राज्य शासनाच्या योजनेप्रमाणे वापरण्यात आले तर उर्वरीत निधी हा जिल्हाधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला होता असे पाटील यांनी सांगितले. नजीकच्या काळात येणार्‍या विधानसभा निवडणूका पाहता जिल्ह्यातील आमदारांना त्यांच्याकडे असलेला १ कोटी रूपयांचा निधी आचारसंहिता लागण्याच्या आधी वापरण्याची सूचनाही नियोजन बैठकीत केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

Show comments