Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहावीच्या प्रमाणपत्रावर जन्मतारीख व जन्मठिकाणाची नोंद

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2016 (15:34 IST)
माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याच्या जन्मतारखेबरोबरच आता जन्मठिकाणाचाही नोंद केली जाणार आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील आदेश दिला आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१७ पासून घेण्यात येणार्‍या परीक्षा प्रमाणपत्रावर हा बदल दिसणार आहे. 
 
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर विद्यार्थ्याचा जन्मदिनांक व जन्मठिकाणाची नोंद असते. या दाखल्यावरील जन्मठिकाणाची नोंद विविध बाबींकरिता ग्राह्य धरली जाते. विद्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट आदी बाबी मिळविण्यासाठी जन्मदिनांक व जन्मठिकाणाची खातरजमा करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याकडून शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत संबंधित यंत्रणेकडून मागविली जाते. दुसरीकडे अकरावीमध्ये अथवा अन्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांस मूळ शाळा सोडल्याचा दाखला संबंधित महाविद्यालयात अथवा संस्थेत जमा करावा लागतो. हा शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यास महाविद्यालय अथवा संबंधित संस्थेकडून परत दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्याना अनके समस्यांना सामोरे जावे लागते.  त्यामुळे माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रावरच आता जन्मतारखेबरोबरच जन्मठिकाणही नमूद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments