Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दाऊदवर एवढी वाईट वेळ आलीय का?: राज ठाकरे

Webdunia
सोमवार, 27 जून 2016 (09:41 IST)
मुंबई- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी फोनाफोनी आणि जमीन घोटाळ्यांच्या आरोपावरून मंत्रिपद गमावलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. दाऊद इब्राहिम एकनाथ खडसेंना कॉल करतो एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली आहे का, असा टोला राज यांनी लगावला आहे.
 
यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी खडसे प्रकरणावर भाष्य केले. 
 
दाऊद पाकिस्तानातून स्वत:ची यंत्रणा सांभाळतो. तो तिथून खडसेंना कशाला फोन करेल? एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली आहे का, असे राज म्हणाले. आपल्याकडे काहीही झाले की लगेच तर्कवितर्क लावले जातात. सगळी मज्जा मज्जा चालली आहे, असे राज म्हणाले.
 
महाराष्ट्र नेहमी देशाचा विचार करतो. इतर राज्ये मात्र स्वत:चा विचार आधी करतात. त्यामुळे यूपीएससी व एमपीएससी परीक्षेतल्या यशवंतांनी महाराष्ट्राचा विचार सगळ्यात आधी करावा, असे आवाहनही राज यांनी यावेळी केले.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments