Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुष्काळाचा मुद्दा संपल्याने नव्या मुद्दय़ासाठी पवारांचा दौरा : खडसे

Webdunia
बुधवार, 23 सप्टेंबर 2015 (11:01 IST)
राज्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे दुष्काळाचा मुद्दा आता संपल्यात जमा आहे. त्यामुळे जनतेला काही दाखविण्यासाठी शरद पवार नवा मुद्दा घेऊन येतील अशी टीका राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मराठवाडय़ाच्या दौर्‍यानंतर विदर्भाच्या दुष्काळी दौर्‍यावर असणार्‍या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.
 
राज्याचे कृषिमंत्री खडसे आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी विदर्भाच्या दुष्काळी दौर्‍यावर असणार्‍या पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. गेल्या आठवडय़ात राज्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यात असणार्‍या दुष्काळाचा मुद्दा आता जवळजवळ संपल्यात जमा आहे. त्यामुळे जनतेला काही दाखविण्यासाठी पवार नवा मुद्दा घेऊन येतील. अशा शब्दात खडसे यांनी पवार यांच्या विदर्भाच्या दौर्‍याचा समचार घेतला.
 
पावसामुळे राज्यातील चारा, पाणी व दुष्काळाचे संकट संपल्यात जमा आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ासाठी सुरू केलेले टँकर्स जवळपास 70 टक्क्यांनी कमी झाले आहेत. 

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments