Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रालय प्रवेशाची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार

Webdunia
सोमवार, 22 डिसेंबर 2014 (11:31 IST)
राज्य सरकारचे मुंबईतील मुख्यालय असलेल्या मंत्रालयामध्ये शासकीय कामासाठी मंत्र्यांना भेटावयाला येणार्‍या राज्यातील लोकांसाठी मंत्रालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी रविवारी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.
 
नागपूर येथे सुरू असलेले महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळीअधिवेशन संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते आणि गृहमंत्रालय यांच्या प्रधान सचिवाबरोबर विचारविनिम करून मंत्रालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुलभ आणि किमान त्रास व्हावा, अशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रालयात नागरिकांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुलभ करा आणि लोकांना प्रवेशासाठी विनाकारण त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याला मुख्यमंत्री देवेंद्र ङ्खडणवीस यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत.
 
मंत्रालयात प्रवेश देण्याची नवी पध्दत 15 जानेवारी 2015 पासून अंमलात आणण्याचा सूचना फडणवीस यांनी दिल्याचे अग्रवाल यांनी प्रतिपादन केले आहे. मंत्रालयात शासकीय कामासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यामधून दररोज मोठय़ा संख्येने लोक मंत्रालयात येत असतात. 

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments