Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्राची चार राज्ये करा : मा. गो. वैद्य

Webdunia
बुधवार, 23 मार्च 2016 (08:52 IST)
महाराष्ट्राची दोन नाही, तर चार राज्ये व्हावीत, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते  मा. गो. वैद्य यांनी केली असून त्यावरून नवे वादळ उठण्याची शक्यता आहे. वैद्य यांनी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्याच्या पाश्र्वभूमीवर बोलताना ही मागणी केली.
 
स्वतंत्र विदर्भ राज्याचे अनेकदा समर्थन करणारे श्रीहरी अणे विदर्भाबरोबर मराठवाडाही स्वतंत्र राज्य व्हावे, असे विधान करून गोत्यात आले. यावरून सरकारची कोंडी झाल्याने अणे यांना राजीनामा द्यावा लागला.
 
राज यांचा संघ व भाजपवर हल्ला
‘अणे यांचा बोलविता धनी रा.स्व.संघ आणि भाजप आहे. राज्य तोडण्याचे काम  अणेंपेक्षा तेच जास्त करत आहेत. ही त्यांच्याच म नातील इच्छा आहे, अणे निमित्तमात्र आहेत’, अशी तोफ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डागली. अणे अधिवेशनाच्या काळातच कसे बोलतात? असा प्रश्न उपस्थित करताना म हाराष्ट्र तोडण्याची भाषा यापुढे कुणी केल्यास कानङ्खटवून काढू, असा इशारा राज यांनी दिला. 

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

Show comments