खासदार राजू शेट्टी यांनी स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या नावाने तब्बल 200 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप, आम आदमी पक्षाचे उमेदवार रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे.
राजू शेट्टी यांनी लोकांनी दिलेल्या पैशांचा गैरवापर करत, सामान्य शेतकर्यांची फसवणूक केली असा घणाघात, रघुनाथदादा यांनी केला आहे. निवडणूक झाल्यावर राजू शेट्टींविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं रघुनाथदादांनी सांगितले.
हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टींना काँग्रेसच्या कल्लाप्पाअण्णा आवाडे आणि आपचे उमेदावर रघुनाथदादा पाटील यांचे आव्हान आहे.