Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राणेंच्या मते, शेतकरी आत्महत्यांमागे दारूचे व्यसन

वेबदुनिया
गुरूवार, 10 डिसेंबर 2009 (19:24 IST)
विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना आर्थिक कारणांबरोबरच काही सामाजिक समस्याही कारणीभूत आहेत. दारूचे व्यसन हे त्यातील प्रमुख कारण आहे. त्यामुळे विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी महसूलमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी महसूलमंत्र्यांनी अमरावती महसूल विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या व आत्महत्या रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला होता.

कर्जबाजारीपणा व आर्थिक अडचणींबरोबरच काही सामाजिक समस्याही आत्महत्यांना कारणीभूत असल्याने महसूलमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, अमरावती या ५ जिल्ह्यात तसेच दारूबंदी असतानाही दारूचे पिणार्‍यांचे प्रमाण अधिक असलेल्या वर्धा जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी केली आहे. कारण या सहा जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे.

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

Show comments