Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना नसेल तर महाराष्ट्र अस्थिर ठाकरे : उद्धव ठाकरे

Webdunia
शनिवार, 24 जानेवारी 2015 (12:14 IST)
जनतेच्या मागचे दुष्टचक संपावे यासाठी शिवसेनेने सत्तेत जायचा निर्णय घेतला. मात्र सत्तेत गेलो याचा अर्थ आम्ही शेपूट घातली असा कोणी घेऊ नये असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना नसेल तर महाराष्ट्र अस्थिर होईल असेही ते म्हणाले. स्वातं‍त्र्यवीर वि.दा. सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यकमात उद्धव ठाकरे बोलत होते. मराठवाडा आणि विदर्भातील जनतेला न्याय मिळतो आहे किंवा नाही हे मी स्वत: दौरा करून पाहणार आहे. सरकारच्या घोषणांची अंमलबजावणी होते आहे किंवा नाही हे मी स्वत: पाहणार असल्याचेही ते म्हणाले.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, बाळासाहेब यांच्यासारखी माणसे ही आयुष्यभर मशालीसारखी जळत राहिली. समाजासाठीच त्यांनी आयुष्य वेचले. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यात यावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. 
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक हे झालेच पाहिजे. स्मारक म्हणजे केवळ त्यांचा पुतळा उभारणे असा होत नाही. त्यांचे स्मारक हे त्यांच्या कर्तृत्वाला साजेसेच असे असायला पाहिजे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

Show comments