Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वतंत्र विदर्भाला आमचा पाठिंबा

वेबदुनिया
WD
यूपीएच्या वतीने येत्या काही दिवसांत स्वतंत्र तेलगणाची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र तेलंगणा होत असेल तर महाराष्ट्रातील स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला आमचा पाठिंबा असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया ही मागणी लावून धरणार असल्याचे आरपीआयचे अध्यक्ष माजी खा. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या

मागणीसाठी विदर्भातील प्रत्येक तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर ५ ऑगस्ट रोजी आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद येथे विभागीय कार्यकर्ता शिबिरास उपस्थित राहाण्यासाठी ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक हिंदूत्ववादी मुद्यावर लढण्याऐवजी विकासाच्या मुद्यावर लढल्या तर त्यात पक्षाला मोठे यश मिळू शकते. महाराष्ट्रात हिंदूत्ववाद चालणार नाही त्यामुळे विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढल्यास जास्त फायद्याचे राहिल, असा सल्ला देत ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या समविचारी पक्षांचा एनडीएमध्ये समावेश केला पाहिजे म्हणजे एनडीएची देशभरात ताकद वाढेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाने इतर पक्षाप्रमाणे तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद येथे पहिले विभागीय कार्यकर्ता शिबिर होत आहे. अशी कार्यकर्ता शिबिर विभागनिहाय घेण्यात येणार आहेत. ३ ऑगस्ट पंचगनी, ८ ऑगस्ट ठाणे किंवा वसई, ११ ऑगस्ट नागपूर, २१ ऑगस्ट अमरावती, २६ ऑगस्ट मुंबई, २८ जळगाव आणि ३० ऑगस्टला महाड येथे शिबिर होणार आहेत.

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Show comments