Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बोर्डाने केली घोषणा इयत्ता १०वी आणि १२वीच्या निकालाची तारीख ठरली

Webdunia
मंगळवार, 10 मे 2022 (08:08 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. दोन्ही इयत्तांचे परीक्षांचे पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परिणामी सध्या निकालपत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच येत्या १० जूनपर्यंत इयत्ता बारावी तर इयत्ता दहावीचा निकाल येत्या २० जूनपर्यंत जाहीर केला जाणार आहे. तशी माहिती मंडळाने दिली आहे.
 
शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निकाल उशीरा लागेल की काय, अशी चिन्हे होती. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंतेत होते. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे लेखी परीक्षा झाली नव्हती. यंदा ती झाली आहे. त्यातच आता निकाल वेळेवर लागणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, आता मंडळाने निकालाची माहिती देऊन मोठा दिलासा दिला आहे.  राज्यात इयत्ता दहावीच्या १६ लाख ३९ हजार १७२ आणि इयत्ता बारावीच्या १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. निकाल वेळेत जाहीर होणार असल्याने पुढील प्रवेश प्रक्रियाही त्यानंतर लवकरच सुरू होणार आहे. परिणामी, पुढील शैक्षणिक वर्षाला विलंब होणार नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

2 महिन्यांच्या नववधूने संपूर्ण कुटुंबासाठी केले पिंड दान कारण जाणून आश्चर्य होणार

रुग्णवाहिकेचा दरवाजा जाम झाला, रुग्णालयाबाहेर रुग्णाचा मृत्यू

पुण्यात नवीन विषाणू गुलेन बॅरी सिंड्रोमचे सापडले 22 संशयित रुग्ण, महापालिका अलर्टमोड़ मध्ये

लॉस एंजेलिसमध्ये आगीचा धोका अजूनही कायम, ट्रम्प देणार भेट

PM मोदी जाणार महाकुंभ मध्ये,सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली

पुढील लेख
Show comments