suvichar

हिंगोलीत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 22 जुलै 2022 (11:53 IST)
हिंगोलीत कळनुरी तालुक्यातील बोधी येथे शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या वसतिगृहात दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. शिवानी सदाशिव वावधने (16 वर्ष रा. वारंगा)असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
 
शिवानी गेल्या पाच वर्षांपासून या आश्रम शाळेत शिकत होती. काल संध्याकाळी वसतिगृहाच्या वार्डन सविता विणकरे या वसतिगृहाची नियमित तपासणी करताना त्यांना शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांनी घडलेला प्रकार मुख्याध्यापकाला सांगितला. त्यानंतर सदर घटनेची आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता त्यांना शिवानीच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याच्या खुणा आढळून आल्या.

या आश्रम शाळेची वेळ अकरा ते पाच असून शिवानी सकाळच्या सत्रात होती. दुपारी  तीन वाजेच्या सुमारास अर्धी सुटी झाल्यावर सर्व मुली हॉस्टेल मध्ये फ्रेश होण्यासाठी जातात आणि पुन्हा वर्गात येतात .सर्व मुली परत वर्गात आल्या मात्र शिवानी आली नाही. संध्याकाळी होस्टेलच्या वार्डन सविता यांना तिने गळफास लावल्याचे आढळून आले. शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केली.  मयत मुलीच्या वडिलांनी सदाशिव नागोराव वावधने यांनी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि होस्टेलच्या वार्डन सविता यांच्या विरोधात तक्रार केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मामाच्या घरी जात असलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात बलात्कार, आरोपीला अटक

ओला, उबर, रॅपिडो ॲप्स कधीही बंद होणार, सरकारने नोटीस जारी केली

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कधी चालणार

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कधी चालणार, माजी आमदार आसिफ शेख यांचा भाजपला सवाल

अमरावतीत उष्णतेची लाट, तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचले

पुढील लेख
Show comments