Marathi Biodata Maker

दहावीची परीक्षा देताय, मग आधार कार्ड अनिवार्य

Webdunia
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017 (10:02 IST)
येणाऱ्या वर्षात जर तुम्ही दहावीची परीक्षा देणार असाल तर तुम्ही आधार कार्ड काढणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरेपर्यंत आधार कार्ड काढलेले नाही अशा विद्यार्थ्यांना आता शाळेतील मुख्याध्यापकांना निकालपर्यंत मी आधार कार्ड काढेन असे हमीपत्र द्यावे लागणार आहे. याबाबतच्या सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.
 
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे काम सध्या सुरु असून त्यासाठी विद्यार्थ्यांना आधार अनिवार्य करण्यात आले आहे. यंदापासून राज्य मंडळाकडून नव्या प्रकारचा अर्ज भरुन घेण्यात येणार असून त्यावर जन्मस्थळाबरोबरच आधार क्रमांक देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आधार काढलेले नाही अशा विद्यार्थ्यांचा आधार कार्डसाठी नोंदणी केलेला नोंदणी क्रमांकही ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र ज्यांच्याकडे नोंदणी क्रमांकही नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज तर भरुन घ्यावेत पण या विद्यार्थ्यांकडून निकालापर्यंत आधार कार्ड काढणार असल्याचे हमीपत्रही भरुन घ्यावे अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिले आहेत. आधार कार्ड नाही म्हणून अर्ज भरला जाणार नाही अशी अडवणूक कोणत्याही प्रकारे शिक्षकांनी व अधिकाऱ्यांनी करु नये अशाही सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.
 
दरम्यान इयत्ता दहावीचे अर्ज भरण्याची 16 ऑक्‍टोबर ते 6 नोव्हेंबर अशी आहे. तर शाळांनी चलनाद्वारे शुल्क भरायची तारीख 7 ते 14 नोव्हेंबर आहे. यानंतर जर अर्ज भरला तर 7 नोव्हेंबर नंतर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज भरावा लागणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

2 महिने नाशिकमधील रामकुंड परिसर बंद!

Cockroach Janta Party हा नवीन पक्ष अचानक कसा उदयास आला? अवघ्या ३ दिवसांत २० लाख सदस्य जोडले गेले!

धक्कादायक : आम्हाला आई-वडील नाही लिहलेली चिट्ठी देत पोटच्या दोन लहान मुलांना बस मध्ये सोडून जन्मदात्या आईने काढला प्रियकरासोबत पळ; बीड मधील घटना

भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिरांचे नूतनीकरण केले जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली

२४ तासांत मराठी घोषणा सुरू करा; राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने विमान कंपन्यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला

पुढील लेख
Show comments