Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या 15 दिवसात 2 मंत्री राजीनामे होतील: चंद्रकांत पाटील

Webdunia
शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (18:25 IST)
पुढील 15 दिवसात आणखी दोन मंत्री राजीनामे होतील, असा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, "आज मी पुन्हा बोलतो की, पुढील 15 दिवसात आणखी 2 मंत्र्यांचे राजीनामे होतील आणि तसं खरंच झालं तर मग पुन्हा म्हणा मला कसं कळतं? हे कोणीही सांगू शकतं. हे सर्वसामान्य माणसाला पण दिसत आहे."
 
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे?"
 
वाझे प्रकरणात मोक्का कायदा लावण्याची मागणी चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.
 
"वाझे प्रकरणात राजीनामे होतील, चौकशी होईल, कदाचित एक वेळ अटकही होईल, पण यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. ही संघटीत गुन्हेगारी आहे आणि संघटीत गुन्हेगारीला मोक्का कायदा लागतो. त्यामुळे आमची मागणी आहे की, या प्रकरणात पुरावे समोर आल्यास संबंधितांना मोक्का कायदा लावावा," अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments