Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खडकवासला धरणसाखळीत २१.४१ अब्ज घनफूट पाणीसाठा

Webdunia
सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (08:35 IST)
खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणांतील पाणीसाठा २१.४१ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधी चारही धरणांतील पाणीसाठा २५.९६ टीएमसी एवढा होता. चारही धरणे सध्या ७३.४६ टक्के भरल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली.
 
खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्यात सलग आठ ते दहा दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे तळाला गेलेला पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली. आजमितीस चारही धरणे ७३. ४६ टक्के भरली असून त्यामध्ये २१.४१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. चारही धरणात समाधानकारक पाणीसाठा असल्याने शहराच्या वर्षभराच्या पाण्याची समस्या संपुष्टात आली आहे. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी विश्रांत घेतली. या चारही धरणात गेल्या चोवीस तासांत शून्य मिलीमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडे करण्यात आली आहे. खडकवासला धरणातून आत्तापर्यंत एकूण ३. ३४ टीएमसी एवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments