Marathi Biodata Maker

शिवसेनेचे 25 आमदार नाराज?

Webdunia
मंगळवार, 8 मार्च 2022 (13:57 IST)
शिवसेनेचे  जवळपास 25 आमदार निधीवाटपाबाबत आवाज उठवणार 
 
सत्ताधारी महाविकास आघाडीतील  शिवसेनेच्या जवळपास 25 आमदारांनी निधीवाटपात होत असलेल्या अन्यायाबाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. आम्हाला जर निधी मिळाला नाही, तर अर्थसंकल्प मांडत असताना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या गोटात एकच खळबळ उडालीय. 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 11 मार्चला सादर करण्यात येणार असून, त्यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहणं आवश्यक असतं.
 
अर्थ विभाग, ग्रामविकास विभाग आणि जलसंपदा या राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांना भरमसाट निधी मिळतोय. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि आमदारांना चांगला निधी देत आहेत, पण आम्हाला निधी मिळत असल्याचं शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं आहे.
 
विशेष म्हणजे काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघांसाठी 900 कोटी रुपये, राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी 700 कोटी रुपये, तर शिवसेनेच्या आमदारांसाठी फक्त 300 कोटी रुपये देण्याचे ठरवण्यात आलेय. अशाच प्रकारे जर निधी वाटप होणार असल्यास अर्थसंकल्पावेळी विधानसभेत बसणार नसल्याचं शिवसेनेच्या आमदारांनी सांगितलंय. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, आमदार आशिष जयस्वाल, भरत गोगावले, वैभव नाईक या चार आमदारांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या जवळपास 25 आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत नाराजी व्यक्त केलीय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली

अमरावती : लग्नाच्या अवघ्या दोन तासांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

नाशिक जिल्ह्यात वडिलांनी दोन मुलांसह विहिरीत उडी मारत आत्महत्या केली

वर्धा : भरधाव वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघातात पती, पत्नी आणि मुलाचा मृत्यू

किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या केली, डोंबिवली मधील घटना

पुढील लेख
Show comments