Publish Date: Wed, 05 Jun 2024 (09:31 IST)
Updated Date: Wed, 05 Jun 2024 (09:33 IST)
कोल्हापूर मधील सायबर चूक मध्ये दुपारी अनियंत्रित कारने 5 बाईकला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 72 वर्षीय वसंत चव्हाण, 8 महिन्याची मुलगी, 16 वर्षीय हर्षद पाटील यांचा मृत्यू झाला आहे. व सहा लोक गंभीर जखमी झाले आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोमवारी दुपारी भीषण कार अपघात झाला. या सैन्ट्रो कारने पाच बाईकला धडक दिली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सूचना मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचलीत. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोल्हापूरमधील ही घटना सायबर चौकामध्ये दुपारच्या वेळी घडली. शिवाजी युनिव्हर्सिटी कडून जलद गतीने येणाऱ्या सैन्ट्रो कारने पाच बाइकस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सहा लोक जखमी झाले तसेच तीन जणांचा मृत्यू झाला आहे.