Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडले; तापी नदीकाठी सतर्कतेचे आवाहन

Webdunia
शनिवार, 24 जुलै 2021 (08:32 IST)
हतनूरमधून 1 लाख 30 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सकाळी 6 वाजता हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.तापी नदीपात्रात 1 लाख 30 हजार 665 क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 
पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पातील 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 51 हजार 925 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पातील 5 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 75 हजार 56 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. हतनूर क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याचा वाढता येवा लक्षात घेता दोन्ही प्रकल्पातून विसर्ग वाढविता येईल. तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments