Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रशासक मुळे ४८ कोटीचा निधी थांबला

Webdunia
शुक्रवार, 29 मार्च 2024 (08:57 IST)
लातूर : मंत्रालय म्हणून समजल्या जाणा-या पंचायत समित्या, लातूर जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा, सभापती, अध्यक्ष कार्यकाळ दि. २० मार्च २०२२ रोजी संपुष्ठात आला. सदर रिक्त झालेल्या पदांच्या निवडणूका न झाल्याने राज्य शासनाकडून लातूर जिल्हा परिषदेवर मुख्यकार्यकारी अधिकारी व पंचायत समित्यावर गटविकास अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमले गेले. तेंव्हा पासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेला १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत येणारा ४८ कोटी पेक्षा जास्त निधी दोन वर्षात न आल्याने ग्रामीण भागातील अनेक विकास कामांना खिळ बसली आहे.
 
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांच्या मार्फत प्रत्येक गावात विकासाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. सदर स्थानीक स्वराज्य संस्थांना १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत बंधीत व अबंधीतच्या माध्यमातून सोयी सुविधा व विकास कामांसाठी येणा-या एकूण निधीत ग्रामपंचायतींचा ८० टक्के, तर पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्रत्येकी १० टक्के असा निधी येतो. 
 
२० मार्च २०२२ पासून पंचायत समित्या व जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल संपल्याने या दोन्ही संस्थावर गेल्या दोन वर्षापासून प्रशासकराज सुरू असल्याने १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी येणे बंद झाले आहे. एका वर्षाला पंचायत समिती व जिल्हा परिषदेला बंधित व अबंधितचे प्रत्येकी ३ कोटी रूपयांचे चार हप्ते येतात. दोन वर्षापासून ४८ कोटी पेक्षा जास्त १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी प्रशासकराजमुळे थांबला आहे. सदर निधी ग्रामीण भागाच्या विकासाला हातभार लावणारा होता.
 
Editedb by Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments