Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

३ दिवसांत ५ कोटी एसमएस शेतकऱ्यांना पाठविले

Webdunia
शुक्रवार, 7 जून 2019 (17:00 IST)
यंदा मॉन्सून उशिरा असल्यामुळे पेरण्या उशिरा करा, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. त्यासाठी गेल्या ३ दिवसांत ५ कोटी एसमएस शेतकऱ्यांना पाठविले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खरीप आढावा बैठकीनंतर त्यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषद घेत खरीप नियोजनाविषयी सांगितले. खरीप आढावा बैठकीला सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
 
मॉन्सूनच्या अंदाजाबाबत हवामान विभागाने सादरीकरण केले. मध्य भारतासह महाराष्ट्रात पाऊस सर्वसाधारण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 
राज्यात सर्वात जास्त पिकाखालील क्षेत्र कापूस आणि सोयाबीनचे आहे. साधारणपणे ५५ ते ६० टक्के क्षेत्र कापूस, सोयाबीन पिकाखाली आहे. तर १० टक्के क्षेत्र भात लागवडीखाली आणि मका पीक क्षेत्र ११ टक्के एवढे आहे. गेल्या वर्षी केवळ ७३ टक्के पाऊस महाराष्ट्रात पडला. विशेषतः मराठवाड्यातील काही भागात कमी म्हणजे ३८ ते ४० टक्के पाऊस पडला होता. या पार्श्वभूमीवर यंदाचे खरिप नियोजन केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.तसेच गेल्या पाच वर्षात शेती क्षेत्रातील गुंतवणूक चार पटीने गुंतवणूक वाढविली, असेही ते म्हणाले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments