Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 500 कोटींची बनावट बिलांचा घोटाळा उघड

Webdunia
शनिवार, 3 डिसेंबर 2022 (22:15 IST)
राज्य कर जीएसटीच्या औरंगाबाद कार्यालयाने केलेल्या तपासणीत 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 500 कोटींची बनावट बिलांचा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1000 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज जीएसटी कार्यालयाने व्यक्त केला आहे. सध्या राज्यकर जीएसटी विभाग या बनावट बिलांचा तपास करीत आहे. दरम्यान, जीएसटी विभागाने बनावट बिले लावून जीएसटीची फसवणुक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. फैजल अब्दुल गफ्फार आणि मोहम्मद अजीज मोहम्मद फकीर अशी या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीनंतर बनावट बिलांचा घोटाळा समोर आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जीएसटी विभागाच्या कोठडीत असलेले आरोपी फैजल अब्दूल गफार मेवावला आणि मोहोमद अजिज यांनी 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सध्या जवळपास 500 कोटींची बनावट बिले केली होती. आता या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1 हजार कोटींच्या घरात असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.
 
दरम्यान, बोगस कंपन्या स्थापन करत इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेत 1 हजार कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश औरंगाबादच्या स्टेट जीएसटी केला होता. या प्रकरणाची व्याप्ती आता हजार कोटीच्या पुढे आणि गुजरातसह देशातल्या विविध राज्यांत असल्याने तपास सुरू केला आहे. तसेच, याप्रकरणी मुंबईत डोंगरी येथून औरंगाबाद स्टेट जीएसटी विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments