Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नगर-कल्याण महामार्गावर तीन वाहनांमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Webdunia
बुधवार, 24 जानेवारी 2024 (12:35 IST)
अहमदनगर जिल्ह्यात एका भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर तीन वाहनांची एकत्रत धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.
 
बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे या ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण निर्मल महामार्गावर ढवळपुरी फाट्या जवळ पहाटेच्या सुमारास उस वाहतुक करणारा ट्रक्टर व एसटी बस आणि इको गाडी यांच्यात जोरदार धडक झाली. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लगेच जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरु असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमींना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
 
या अपघातामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी वडोदरा येथे तिघांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भाजपचे लोक शिवाजी महाराज यांच्या समोर हात जोडतात, पण त्यांच्या विचारांविरुद्ध काम करतात-राहुल गांधी

तरुणांना ड्रग्जकडे ढकलून कमावलेल्या पैशातून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे- पंत प्रधान मोदी

Russia Ukraine War:रशियन ड्रोन हल्ल्यात युक्रेनचे अनेक तळ उद्ध्वस्त, एकाचा मृत्यू

लिओनेल मेस्सी विश्वचषक पात्रता फेरीसाठी अर्जेंटिना संघात परतला

पुढील लेख
Show comments