Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे मंत्रालयातून निघाला तब्बल ६५० ट्रक कचरा

Webdunia
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (16:31 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकारी मंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनांचे नूतनीकरण करताना तब्बल ६५० ट्रक कचरा निघाला आहे. काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांच्या लक्षवेधी सूचनेच्या निमित्ताने विधान परिषदेत ही माहिती उघड झाली. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केली आहे.
 
ऑक्टोबर २०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतर काही मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले. फेब्रुवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ या दरम्यान मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले होते. हे काम झाल्यानंतर मंत्र्यांच्या दालनातून ६५० ट्रक कचरा काढण्यात आला. तो वाहून नेण्यासाठी ६७ लाख रुपये खर्च करण्यात आले, असा आरोप गाडगीळ यांनी केला. याविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे गोपनीय आदेश निघाले. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

संबंधित माहिती

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments