Marathi Biodata Maker

नागपूरमधील रुग्णांच्या मृत्यूंबाबत प्रशासनाचा वेगळाच खुलासा

Webdunia
बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (21:13 IST)
नागपुरातील शासकीय रुग्णालयात 48 तासांत 25 मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 16 रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले तर 9 रुग्ण हे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले आहेत. 25 पैकी 12 रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते.

तसंच, खासगी रुग्णालय रुग्णांची स्थिती बघून त्यांना अॅडमिट करून घेतात, तर शासकीय रुग्णालयात सर्वांनाच अॅडमिट करून घ्यावं लागलं त्यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचं या रुग्णालयातील प्रशासनाचं म्हणणं आहे. तसंच, रुग्णांच्या मृत्यूचा हा आकडा नियमित असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. त्यांनी हा खुलासा केल्यानंतर मात्र आता एकच खळबळ उडाली आहे.

शासकीय रुग्णालयांत मृत्यूतांडव
ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूतांडव सुर आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात 16 नवजात अर्भकांचा समावेश आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका दिवसता झालेल्या मृत्यूचा हा आजवरचा सर्वात मोठा आकडा आहे.

एका बेडवर दोन ते तीन बालकांवर उपचार सुरू होते अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. तसंच, छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयातही 24 तासांत 18 जणांचा मृत्यू हे मृत्यू औषधांचा तुटवडा किंवा प्रशासनाच्या कमतरतेमुळे झाले नाहीत असा दावा रुग्णालयाचे डीन संजय राठोड यांनी केला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

LIVE: आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी APAAR ID नोंदणी करणे बंधनकारक केले

पुढील लेख
Show comments