Festival Posters

ठाण्यात बेकायदेशीर वसतिगृहात गैरवर्तन प्रकरण उघडकीस,29 मुलांची सुटका पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Webdunia
शनिवार, 12 एप्रिल 2025 (15:37 IST)
ठाणे जिल्ह्यात एका संस्थेद्वारे चालवणाऱ्या अनधिकृत वसतिगृहात होणाऱ्या गैरवर्तनच्या तक्रारी नंतर 29 मुलांची सुटका करण्यात आली आहे. अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 
ALSO READ: ठाणे : आधी मैत्री नंतर कोट्यवधींची फसवणूक करून पीडितेला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न
जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शुक्रवारी पोलिसांनी एका निवासी संस्थेतून 20 मुली आणि 9 मुलांची सुटका केली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध बाल न्याय कायदा 2015 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 
चाइल्ड हेल्पलाइन' ला गुरुवारी तक्रार मिळाली होती की संस्थेत मुलांना मारहाण आणि लैंगिक शोषण केले जात आहे. जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयाच्या पथकाने पोलिसांसह शुक्रवारी संस्थेची पाहणी केली आणि मुलांशी बोलल्यानंतर त्यांना आरोप खरे असल्याचे आढळून आले, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मुक्त केलेल्या मुलांना बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले.
ALSO READ: डेंग्यूच्या रुग्णाचे काढले ६ लाख रुपये बिल, अमृत दिले का? आमदारांनी डॉक्टरांना विचारला जाब
ठाणे जिल्हा दंडाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, मुलांची सुरक्षा आणि कल्याण हे नेहमीच प्रशासनाचे प्राधान्य राहिले आहे. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी अशा अनधिकृत संस्थांविरुद्ध पुढे येण्याचे आणि मुलांवर होणारे कोणतेही अत्याचार किंवा शोषण नोंदवण्याचे आवाहन लोकांना केले.
 
Edited By - Priya Dixit  
ALSO READ: एफडीए विभागाने नागपूर जिल्ह्यात कारखान्यावर छापा टाकून ३० लाख रुपयांची सुपारी केली जप्त
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

२०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी महिला आरक्षण कायदा लागू होऊ शकतो, सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारणा विधेयक आणण्याच्या तयारीत आहे

राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य: युद्धामुळे ऊर्जा संकट अधिक गडद, ​​भारतासमोर 'मोठी परीक्षा'

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

महाराष्ट्रात मोठे बदल, लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ पर्यंत वाढण्याची शक्यता

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात, समीर वानखेडे यांची मुंबई उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्याची मागणी

पुढील लेख
Show comments