rashifal-2026

Accident : देवदर्शन वरून परतताना अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (10:02 IST)
उमरगा :श्रावण सोमवारच्या निमित्ताने देवदर्शन आटोपून गावाकडे परतणाऱ्या आटोला ट्रकची धडक होऊन अपघात झाल्याची घटना सोलापूर हैद्राबाद मार्गावरील मन्नाळी येथे घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. कर्नाटकातील अमृतकुंड येथून देवदर्शन आटोपून उमरगा तालुक्यातील सुंदरवाडीचे राहणारे सुनील महादेव जगदाळे हे आपल्या आई, पत्नी, मुलगी, भाची आणि इतर दोघांना घेऊन श्रावणी सोमवार असल्यामुळे आटोरिक्षातुन हे साती जण कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यात अमृतकुंड दर्शनासाठी गेले होते. परतताना सोलापूर- हैद्राबाद महामार्गावर मन्नाळी कॉर्नर वर यांच्या आटोला ट्रक ने  पाठीमागून जोरदार धडक दिली.आटो दुभाजकावर चढून पालटला .या अपघातात प्रमिला सुनील जगदाळे या रस्त्यावर पडल्या आणि ट्रकच्या खाली चिरडल्या गेल्या त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर सुनील जगदाळे, अनुसया महादेव जगदाळे, पूजा विजय जाधव, यांचा मृत्यू झाला. तर गीता शिवराम जगदाळे , लक्ष्मी सुनील जगदाळे, अस्मिता शिवराम जगदाळे या गंभीर जखमी झाल्या. यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.    

अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळतातच बसवकल्याणचे आमदार शरणु सलगर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन  मृतदेह ताब्यात घेतले आहे आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

या अपघातात सुनील जगदाळे आणि त्यांची पत्नी प्रमिला जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून आई वडील अपघातात मरण पावल्याने ते पोरके झाले आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Animal Rights Day 2025 : आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन

World Human Rights Day 2025 जागतिक मानवी हक्क दिन

Indigo Crisis इंडिगोचे संकट नवव्या दिवशीही कायम, दिल्ली-मुंबई विमानतळावर उड्डाणे रद्द

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

पुढील लेख
Show comments