Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आठ तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा नगर जिल्ह्यातील मंत्र्यांना गावबंद करू

Webdunia
बुधवार, 19 जानेवारी 2022 (08:42 IST)
सिंगलफेज बंदचे धोरण मागे घ्यावे, आठ तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा नगर जिल्ह्यातील मंत्र्यांना गावबंद करू, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला.

तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, महावितरणच्या माध्यमातून सुरू असलेले वीजबंद धोरण शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे.

झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्याचे काम करावे लागेल, असा इशारा कर्डिले यांनी दिला. डाॅ.तनपुरे कारखान्याचे संचालक रविंद्र म्हसे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती.

मात्र ही घोषणा हवेत विरली. राहुरी तालुक्यात चालू डीपी बंद केली जाते हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुदैवी ठरले आहे. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे म्हणाले, महावितरणकडून चालू रोहित्र बंद वीज पुरवठा बंद करण्याचे धोरण जुलमी पद्धतीचे आहे.

वीजबील पठाणी वसुली पद्धत बंद करून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे काम करा अन्यथा शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा उद्रेक होईल. शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी संकटात आहेत.

त्यांना आधार देण्याऐवजी चालू रोहित्र बंद करून वीजबिल वसुलीचे अन्यायकारक धोरण अवलंबवले जात आहे. जळालेले ट्रान्सफार्मर,केबल व इतर खर्चाची कामे शेतकऱ्यांवर टाकली जात असेल तर महावितरण कशासाठी ?, असा सवाल यावेळी माजी आमदार कर्डिले यांनी उपस्थित केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments