Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारी यंत्रणांचा वापर करुन अहिल्यादेवींची पुण्यतिथी हायजॅक- फडणवीस

Webdunia
मंगळवार, 31 मे 2022 (16:15 IST)
चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्वप्रकारचे लोक याठिकाणी येतात. पण यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करुन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर  आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत  यांना चोंडीला जाताना पोलिसांनी अडवले. या घटने नंतर फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
 
महाविकास आघाडीवर निशाणा साधताना ते म्हणाले, राम शिंदे हे अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत त्यांनाही त्रास देण्यात आला आहे. गोपिचंद पडळकर हे अहिल्यादेवींच्य़ा विचाराने चालतात त्यांनाही अडवले जात आहे. यांना का अडवले जात आहे असा सवाल त्यांनी केला. यासंदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आणि हायजॅक बंद झाले पाहिजे असेही ते म्हणाले.
 
राज्यसभा उमेदवारी संदर्भात बोलताना ते म्हणाले, भाजपातील सर्व आमदार सद्सद्बुध्दीचा वापर करुन मते देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले, सूर्याकडे बघून थुंकले की थुंकी आपल्याच तोंडावर पडते. त्यांनी सूर्याकडे बघून थुंकण्याचा प्रयत्न केला आहे. थुंक त्यांच्या तोंडावरच पडेल असा टोलाही लगावला.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments