Marathi Biodata Maker

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने केल असे काही ! पण अखेर गुन्हा दाखल…

Webdunia
सोमवार, 17 मे 2021 (16:03 IST)
पत्नीची हत्या करून तिने आत्महत्या केली आहे, असा बनाव करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील पती विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी याच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मढी खुर्द येथील विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी व त्याची पत्नी सुवर्णा यांच्यात १३ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास भांडण झाले होते. त्यावेळी विजय याने पत्नीच्या डोक्यात टणक शस्राने मारून ठार केले. मृत शरीरावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मृत शरीरावर नवीन कपडे घातले व पत्नीने आत्महत्या केल्याची नातेवाईकांना माहिती दिली होती.सुवर्णा गवळी हिने आत्महत्या केली असल्याच्या खबरीवरून कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला १४ मे रोजी अकस्मात मृत्युची नोंद केली होती.
 
पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी या घटनेची चौकशी केली असता त्यातून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे समोर आले.याबाबत हेड कॉन्स्टेबल अमर गवसने यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, आरोपीने मृत सुवर्णाच्या डोक्यात टणक शस्त्राने मारून ठार केले. मृत शरीरावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केल व पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील जळालेले कपड्यांचे अवशेष लपवून ठेवले. तिच्या मृत शरीरावर नवीन कपडे घातले.
 
सुवर्णा हिने आत्महत्या केल्याची खोटी माहिती नातेवाईकांना देऊन पुरावा नष्ट केला. याप्रकरणी विजय ऊर्फ बंडू गवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपात33 जण जखमी, दोन फूट उंच त्सुनामीच्या लाटा आल्या

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

इंडिगोच्या 200 हुन अधिक उड्डाणे रद्द, 10 विमानतळांवर अधिकारी तैनात

मोरया गोसावी संजीवन समाधी : मोरया गोसावी कोण होते?

वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित, कुटुंबांना देणार सरकारी नोकरी; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments