Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग,आरोग्य विभागाकडून कठोर कारवाई, चार जणांना अटक

Webdunia
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (08:21 IST)
अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोग्य विभागाने कठोर कारवाई केली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि 3 परिचारिकांचा समावेश आहे. वैद्यकिय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना अंनत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. विशाखा शिंदे आणि सपना पठारे यांचं निलंबन केलं होतं, तर अस्मा शेख आणि चन्ना अनंत यांची सेवा समाप्त केली होती.
 
अहमदनगरमधल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयूत शनिवारी सकाळी आग लागली होती. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते.  धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाता आलं नाही.  अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडक्यांच्या काचा फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

एका अधिकाऱ्याने दावा केला की बहुतेक रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यापैकी बहुतेक व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर होते. त्यामुळे बचावकार्य अधिक गुंतागुंतीचं झाले. सकाळी 11 वाजता आग लागल्यावर प्रथम घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 11 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 15 रुग्ण व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर होते.
 
आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी सहा सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांनी दिली. डॉ. भारती पवार यांनी शनिवारी दुपारी रुग्णालयाला भेट दिली होती. आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांबद्दल त्यांना दु:ख व्यक्त केलं.
 
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार असल्याची माहिती दिली, तर एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. 
 

संबंधित माहिती

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments