Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारने आणखी किती माणसं मारायचं ठरवलं आहे? - अजित पवार

ajit panwar
Webdunia
बुधवार, 26 जुलै 2017 (15:35 IST)
घाटकोपर येथील सिद्धिसाई या इमारतीला झालेल्या दुर्दैवी अपघाताबाबत आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली. सिद्धीसाई इमारत दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेला आहे. ज्या ज्या वेळी पावसाळा येतो तेव्हा अशा घटना घडून अनेकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. घाटकोपर येथील इमारत तळमजल्यावरील नुतनीकरणाच्या कामामुळे झाला आहे.
 
या कामाला पालिकेची परवानगी न घेता इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल केला गेला. तक्रार देऊनही पालिकेने याकडे लक्ष दिले नाही. शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितप यांनी रहिवास्यांच्या तक्रारीला न जुमानता हे नुतनीकरणाचे काम केले होते, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केला आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित असून या गंभीर विषयावर सभागृहात याची चर्चा करावी यासाठी मुंडे यांनी सभागृहात २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला.
 
सरकारच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे दरवर्षी कित्येक हकनाक बळी जातात. सरकारने आणखी किती माणसं मारायचं ठरवलं आहे, असा जळजळीत प्रश्न विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  यांनी सभागृहात विचारला. यावर काहीतरी उपाय होणार आहेत की नाही असा त्यांनी सरकारला जाब विचारला.
 
सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात वाघ आणि बिबट्याचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू

मुंबई: निवासी इमारतीला भीषण आग, सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

'मी माझ्या लाडक्या बहिणींना २१०० रुपये देईन, पण...', अजित पवारांची लाडकी बहीण योजनेवर मोठी घोषणा

इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्याने उड्डाण रद्द, मोठा अपघात टळला

युवा क्रिकेटपटू सोहम पटवर्धन यांना सानंद युवा पुरस्कार

पुढील लेख
Show comments