Dharma Sangrah

सरकारने आणखी किती माणसं मारायचं ठरवलं आहे? - अजित पवार

Webdunia
बुधवार, 26 जुलै 2017 (15:35 IST)
घाटकोपर येथील सिद्धिसाई या इमारतीला झालेल्या दुर्दैवी अपघाताबाबत आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली. सिद्धीसाई इमारत दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेला आहे. ज्या ज्या वेळी पावसाळा येतो तेव्हा अशा घटना घडून अनेकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. घाटकोपर येथील इमारत तळमजल्यावरील नुतनीकरणाच्या कामामुळे झाला आहे.
 
या कामाला पालिकेची परवानगी न घेता इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल केला गेला. तक्रार देऊनही पालिकेने याकडे लक्ष दिले नाही. शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितप यांनी रहिवास्यांच्या तक्रारीला न जुमानता हे नुतनीकरणाचे काम केले होते, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केला आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित असून या गंभीर विषयावर सभागृहात याची चर्चा करावी यासाठी मुंडे यांनी सभागृहात २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला.
 
सरकारच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे दरवर्षी कित्येक हकनाक बळी जातात. सरकारने आणखी किती माणसं मारायचं ठरवलं आहे, असा जळजळीत प्रश्न विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  यांनी सभागृहात विचारला. यावर काहीतरी उपाय होणार आहेत की नाही असा त्यांनी सरकारला जाब विचारला.
 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

ओडिशातील ढेंकनाल येथे दगड खाणीत स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचाव कार्य सुरू

इंदूरमध्ये दूषित पाण्याने गेला 15 जणांचा जीव, 200 हून अधिक जणांवर उपचार सुरू

LIVE: नाशिक एबी फॉर्म वादावर मुख्यमंत्र्यांची कारवाई, दिले हे आदेश

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ

AUS vs ENG: सिडनीमध्ये पाचव्या अ‍ॅशेस कसोटीसाठी सुरक्षा कडक, गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

पुढील लेख
Show comments