Dharma Sangrah

सरकार नीट काम करत नाही म्हणून आम्हाला ही.... - अजित पवार

Webdunia
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (17:16 IST)
राज्यात तीन वर्षांपूर्वी आलेलं सरकार नीट काम करत नाही म्हणून आम्हाला ही हल्लाबोल पदयात्रा काढावी लागत आहे. याआधीही मा. शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जळगाव ते नागपूर अशी दिंडी काढली होती. शेतकरी तेव्हाही हवालदिल झालेला होता, आजची परिस्थितीही तशीच आहे म्हणून ही पदयात्रा. असे मत अजित पवार यांनी यवतमाळ येथे व्यक्त केले आहे, 
अजित पवार पुढे म्हणतात की आज हे सरकार शेतकऱ्यांना निकडीची असलेली कर्जमाफी देत नाही. रोज तारीख पे तारीख जाहीर करत आहेत. खोट्या जाहिराती देण्यात मग्न आहे हे बोगस सरकार आहे. सोयाबीनला भाव नाही. कापसाची पण तीच अवस्था. हे सरकार कोणत्याच समाजाला न्याय देत नाही. या सरकारला आता आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवावाच लागेल. फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी जीव गमावला हेच का सरकारचे लाभार्थी का? बोंड आळीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. केंद्रात, राज्यात यांचंच सरकार आहे तरी शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही.
 
 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. गुजरात निवडणुकीत राहुल गांधी, राजीव गांधी यांच्या जातीचा विषय काढला जातो हे काय देशाच्या हिताचा विषय आहे का? तणाव कसा निर्माण होईल याच्या प्रयत्नात हे सरकार कायम असतं. महिलांवर आज अत्याचार वाढत आहे हे या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच होत आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातो, त्यांना मारहाण केली जाते, या सरकारला कसली मस्ती चढली आहे. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी या पदयात्रेत महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे बोलत सरकारव पवार यांनी टीका केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

हे काय ! शिवसेनेच्या उमेदवाराने स्वतःच्याच नेत्याचा एबी फॉर्म फाडून गिळला

चालत्या व्हॅनमध्ये क्रूरता, नंतर पीडितेला रस्त्यावर फेकून दिले; या प्रकरणाने देशाला हादरवून टाकले

आदित्य ठाकरेंच्या कोअर टीमला मोठा धक्का: शीतल देवरुखकर-शेठ उद्धव ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये सामील

बीएमसी निवडणुकीत मतविभाजनाची भीती संपली ? ३२ जागांवर 'तिसरी आघाडी' नसेल, दोन आघाड्या आमनेसामने येतील

BMC Election 2026 : ठाकरे बंधूंचा जाहीरनामा ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार, तर भाजप ५ तारखेनंतर प्रसिद्ध करणार

पुढील लेख
Show comments