Festival Posters

सरकार नीट काम करत नाही म्हणून आम्हाला ही.... - अजित पवार

Webdunia
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (17:16 IST)
राज्यात तीन वर्षांपूर्वी आलेलं सरकार नीट काम करत नाही म्हणून आम्हाला ही हल्लाबोल पदयात्रा काढावी लागत आहे. याआधीही मा. शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जळगाव ते नागपूर अशी दिंडी काढली होती. शेतकरी तेव्हाही हवालदिल झालेला होता, आजची परिस्थितीही तशीच आहे म्हणून ही पदयात्रा. असे मत अजित पवार यांनी यवतमाळ येथे व्यक्त केले आहे, 
अजित पवार पुढे म्हणतात की आज हे सरकार शेतकऱ्यांना निकडीची असलेली कर्जमाफी देत नाही. रोज तारीख पे तारीख जाहीर करत आहेत. खोट्या जाहिराती देण्यात मग्न आहे हे बोगस सरकार आहे. सोयाबीनला भाव नाही. कापसाची पण तीच अवस्था. हे सरकार कोणत्याच समाजाला न्याय देत नाही. या सरकारला आता आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवावाच लागेल. फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी जीव गमावला हेच का सरकारचे लाभार्थी का? बोंड आळीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. केंद्रात, राज्यात यांचंच सरकार आहे तरी शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही.
 
 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. गुजरात निवडणुकीत राहुल गांधी, राजीव गांधी यांच्या जातीचा विषय काढला जातो हे काय देशाच्या हिताचा विषय आहे का? तणाव कसा निर्माण होईल याच्या प्रयत्नात हे सरकार कायम असतं. महिलांवर आज अत्याचार वाढत आहे हे या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच होत आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातो, त्यांना मारहाण केली जाते, या सरकारला कसली मस्ती चढली आहे. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी या पदयात्रेत महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे बोलत सरकारव पवार यांनी टीका केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

23 वर्षांचा प्रवास संपवून अमृता फडणवीस यांनी अ‍ॅक्सिस बँकेतून राजीनामा दिला

भिवंडीमध्ये भाजपच्या नऊ नगरसेवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

LIVE: भिवंडीमध्ये भाजपच्या नऊ नगरसेवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

शिवनेरीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस गर्जना: किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली

T20I विश्वचषकात श्रीलंकेला त्यांच्याच मैदानात हरवून झिम्बाब्वेने मोठा धक्का दिला

पुढील लेख
Show comments